Wednesday, 24 June 2015

नमो 'टीका आणि द्वेष'



आजकाल टीका किती आणि कुठपर्यंत करावी याची मर्यादा नाही उरली असेच वाटत आहे. किंबहुना टीका आणि द्वेष, यात काही फरकच उरला नाही असे वाटत आहे. मुख्यतः प्रधानमंत्री वर आणि सहकारी मित्रावर केली जाणारी टीका त्याच प्रकारची आहे, मग ती योग दिनासंबंधीची असो किंवा कुणाच्या पदवी संबंधीची, त्यात काही फरक उरला नाही. मुख्य मुद्दे राहिले बाजूला आणि त्याच त्याच किरकोळ गोष्टीवर रोज वाद उठवला जातो आहे. भरकटलेला हत्ती जसे दिशाहीन पावुले टाकत जात असतो तश्याच प्रकारची दिशाहीन वाटचाल सध्या नेतृत्वहीन कॉंग्रेस पक्ष्याची आणि पर्यायाने विरोधकांची झालेली  आहे.

काल कुठेतरी वाचले, कि माननीय पुतीन यांनी केलेली शंका बरोबर निघाली आणि मोदिजी योग करत नाही रोज. त्याला पुस्त दिली होती एका चित्राची, जेवा प्रधानमंत्री राजपथवर योग करीत होते. खरे तर त्या चित्रामध्ये साफ दिसते कि त्यांचा उजवा हात डाव्या गुडघ्याचा पलीकडे पोहोन्चात नव्हता. याचा अर्थ हा होत नाही कि ते रोज योग करीत नाही. दुसरा फोटो हा पद्मासानाचा दाखवला जात अहे. प्रत्येक योगशिक्षक हे सांगतो कि आपल्याला सहज वाटेल त्यात आसामध्ये योग करावेत, मग ते पद्मासन असो, किंवा वज्रासन, किंवा मग सरळ मंदी घालून करणे असो. योग करणार्यांनी आपणास विचारावे कि पश्चिमोत्तानासन करताना कितीजनाचे हात पोहोन्चतात आणि गुडघे सरळ असतात. हे आपण सर्व जाणतो कि ज्याला जश्या प्रकारची असणे जमतात आणि झेपतात तेच ते लोक नियमितपणे करीत असतात. उदाहरण द्यायचे झाले तर, ९५ % नियमित पणे योग करणारे शीर्षासन करत नसतात. खरे तर मोदिजी ने कुठे हि असे नाही म्हणाले कि मी रोज अश्या प्रकारची सगळी आसने आणि योग नित्यनियमित करतो. कोणती बाब हि प्रतिकात्मक असते हीच गोष्ट हे लोक विसरले आहेत कि काय? उद्या म्हणतील प्रधानमंत्री झाडू मारत पुढे जात आहेत अन मागे कचरा जशास तसा आहे, म्हणून त्यांना साधी साफसफाई सुद्धा ठीक करता येत नाहि. त्यामुळे या प्रकारावरून प्रधानमंत्री ची अवहेलना करणे म्हणजे टीका नव्हे तर द्वेषच होय असा संदेश यानिमित्ताने विरोधक समाजामध्ये पसरवीत आहे आणि गम्मत म्हणजे याचे त्यांना सुद्धा भान नाही.

दुसरे सुरेश प्रभू चा फोटो प्रत्येक मेडिया दाखवत आहे. ते सुद्धा त्यातलेच आहेत, म्हणजे त्याच्याच शब्दात सांगायचे तर ढोंगी आहेत असे त्यांना दर्शवायचे असते. शवासन करताना कित्येक जणांना झोप लागते आणि हि काही इतकी महत्वाची बातमी नाही कि कित्येक वृत्तपत्रामध्ये पहिले पानावर जागा घेयील. पण तरी मनातला द्वेष त्यांना पहिल्या पानावर जागा देतो. मग त्यात असे कितीही जोडले गेले तर नवल काय? अमित शहा नि योग नाही केला, वसुंधराराजे कुठले असणा करीत आहे ते त्यांना तरी कला आहे का, सुषमा स्वराज यांना न्यूयॉर्क ला पाठवाण्याची काय गरज, इत्यादी. असौउदिन ओवासी ने तर पूर्ण सभेमध्ये प्रधान्मात्री च्या शिक्षणावर आणि त्याच्या इग्रजी भाषेवर अतिशय अवहेलानात्मक वक्तव्य केले. यातून एकाच कळते कि यांना टीका करायची नसून, टीकेच्या नावाखाली आपला द्वेष प्रकट करायचा आहे. यांना अजून हि नाही कळले कि हे सरकार सत्तेवर आले कसे. किंबहुना एक वर्ष्यानंतर सुद्धा यांना हे अजून पचले नाही असे म्हणवे लागेल. 

No comments:

Post a Comment